ती
येते तेव्हा..........
गेल्या आठवड्यात ऑस्कर पुरस्कार सोहळा झाला...सर्व सिनेरसिकांचे लक्ष
या सोहळ्याकडे होते...भारतातील सिनेरसिकांसाठीही एक चांगली बातमी होती... उत्तर
प्रदेशातील हापूर या गावातील महिलांवर बनवलेल्या एका माहितीपटाला शॉर्ट सब्जेक्ट’ या विभागात सर्वोत्कृष्ट पुरस्कार
मिळाला आहे...मासिक पाळी हा या माहितीपटाचा विषय आहे...

‘पॅडमॅन’ म्हणून नावारूपाला आलेले अरुणाचलम
मुरुगनंथम यांच्या कार्याने प्रेरित होऊन उत्तर प्रदेशातील गावात पॅड मशीन
बसविणाऱ्या आणि त्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांची कहाणी यात आहे. उत्तर
प्रदेशातील हापूर या गावातील महिला आणि मुलींनी मुरुगनंथम यांनी तयार केलेले
सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करणारे ‘पॅड
मशीन’ गावात बसविले. त्यानंतर या महिलांना
नेमके कसे अनुभव येतात, त्या सर्वांशी कशा संघर्ष करतात, या सगळ्याचे चित्रण या २६ मिनिटांच्या
माहितीपटात आहे. गुणित मोंगा या माहितीपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. विविध
पुरस्कार मिळालेल्या इराणी-अमेरिकी दिग्दर्शिका रायका झेहताबची यांनी हा माहितीपट
दिग्दर्शित केला आहे. लॉस एंजेलिसमधील ओकवूड स्कूलच्या शिक्षिका मेलिसा बर्टन आणि
त्यांचे विद्यार्थी यांनी स्थापन केलेल्या ‘दी
पॅड प्रोजेक्ट’ या संघटनेने हा माहितीपट तयार केला
आहे. मासिक पाळीशी निगडित अंधश्रद्धांमुळे या गावातील मुलींना सॅनिटरी पॅड्स मिळत
नव्हती. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायचे आणि मुलींची शाळा सुटायची.
गावात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसविल्यानंतर महिला स्वतःच पॅड्स तयार करायला
आणि त्याचे मार्केटिंग करायला शिकल्या. त्यामुळे साहजिकच त्यांचे सबलीकरण झाले. ‘फ्लाय’ असे त्यांनी केलेल्या पॅड्सचे नाव ठेवण्यात आले. या साऱ्याची गोष्ट
माहितीपटात आहे. अगदी ग्रामिण बोली भाषेत
असलेला हा माहितीपट बघतांना आपल्या आसपास कथा होतेय असेच वाटते.
‘मासिक
पाळीच्या विषयावरील माहितीपटाला ऑस्कर मिळू शकतो, यावर माझा विश्वासच बसत नाहीये,’ अशी
भावना दिग्दर्शिका रायका यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर व्यक्त केली. गुणित मोंगा यांनीही ‘या पृथ्वीवरील प्रत्येक मुलगी ही देवता
आहे, हे तिला कळलेच पाहिजे,’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे
या माहितीपटाचे विश्लेषण
वाचतांना मला जाणवलं, हा माहितीपट खेड्यातील महिलांच्यावर केलेला आहे...पण आपल्या
शहरी भागातील महिला तरी आज मासिक पाळीबाबत बोलू शकतात का....मला तर अजूनही तसा
मोकळा अनुभव आलेला नाही....आपल्याच आसपास नजर टाका...आजही मासिक पाळीबाबत
मोकळेपणाने बोलू शकत नाही...फार काय शहरी महिला पॅड वापरतात...पण किती महिला पुरुष
दुकानदार असलेल्या मेडीकल शॉप वा अन्य दुकानातून मोकळेपणाने पॅडची मागणी करु
शकतात...मैत्रिणींनो याबाबत प्रत्येकीचा एक काय अनेक अनुभव असेल, नक्कीच. मध्यंतरी मी एका परिचितांच्या घरी गेले
होते. दोन दिवसांचा घरगुती
कार्यक्रम...मला अचानक मासिक पाळी आली...मी त्या घरातील महिलेकडे पॅडची मागणी
केली...तिने मला बाजुच्या रुममध्ये नेले. कपाटात एकदम कोप-यात लपवून ठेवलेला पॅड
काढून दिला...सोबत घरात फार कुठे वावरु नकोस हा सल्लाही...मी सु्न्न झाले...एरवी
आधुनिक म्हणून घेणा-यांची अशी विचारसरणी पाहिली की चि़डही तेवढीच येते....शहरात हा
फरक तर गावात कसं असेल हा विचार तेव्हाही मनात आलाच होता...वास्तविक आपणच त्याला
प्रॉब्लेम म्हणतो...पण मासिक माळी म्हणजे प्रॉब्लेम नाही तर ती न येणं म्हणजे
प्रॉब्लेम असू शकतो, हे कोणी सांगितले आहे
का....


वास्तविक या दिवसात महिला
शारीरिक त्रास सहन करत असतात...वेदना होतात...थकवा...चि़डचिड...असे अनेक
प्रकार...या काळात तिला समजून घेण्याची गरज असते...पण ब-याचवेळा तिची हेटाळणी
होते...त्यामुळे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्हीही पातळीवर तिला एकाकी लढा द्यावा लागतो...इथे
शेतात काम करणारी महिला असो की ऑफीसमध्ये काम करणारी असो वा घरात असणारी असो
सगळ्याच सारख्या पातळीवर येतात...
समाधान एवढचं की ‘पीरियड – एंड ऑफ सेन्टेन्स’ या माहितीपटाच्या मुळे पुन्हा हा विषय
चर्चेत आला...मान्य आहे की काही प्रमाणात सुविधा येत आहेत. सॅनेटरी पॅड सहज मिळतील अशी सोय होत आहे...पण
सोयी बरोबरच मानसिकताही सुधारली पाहिजे...यासाठी आपण आपल्या घरातच पहिल्यांदा
डोकावून पहाण्याची गरज आहे. या आठवड्यात
महिला दिन साजरा होईल...एका दिवसाच्या सोहळ्याला या विचाराचे कोंदण दिले तर महिला
नक्कीच स्वतःला दीन समजणार नाहीत...
सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------
कृपया
आपला अभिप्राय खाली नोंदवावा
Very nice article on the subject "periods" keep it up.
ReplyDeleteTODAYS TOPIC IS VERY EMOTIONAL.
ReplyDeleteThanks...pls follow...its every saturday
Deleteआदरणीय सईजी महिला विषयक प्रश्न अतिशय छान आणि विस्तृत पणे आपण मांडलाय
ReplyDeleteThanks...pls follow...its every saturday
Deleteअतिशय संवेदनशील विषय उत्तम मांडला आहेस.मुख्य म्हणजे डॉ.स्नेहलता देशमुखांनी गौरी गणपतीचे निमंत्रण इतकं वेगळं दिलयजे नक्की परिवर्तनाच्या दिशेने जाणारं आहे.खूप छान लेख!
ReplyDeleteखूप छान मॅडम...सगळ्या महिलांचा विषय..पण तरीही मांडतांना धाकधूक होती...पण आपल्या सारख्यांच्या प्रतिक्रीयेमुळे पाठबळ मिळतं...धन्यवाद
Deleteमासिक पाळी हा विषय मांडलेला असलेल्या सिनेमाचं ऑस्कर आणि त्या वरून तुझा ब्लॉग छान आहे समाजमन अजूनही बदलतंय हे मात्र आहे
ReplyDeleteहो...नक्की...पण वेळ द्यावा लागेल...धन्यवाद
DeleteKhupach kahitari ghan ahe as samjnaryana changlach dhada milel keep it up
ReplyDeleteधन्यवाद
DeleteVegal ghan as samjnaryanache changlech dole ughadles keep it up
ReplyDeleteThanks...pls follow...its every saturday
Deleteखुप छान, अप्रतिम...
ReplyDeleteधन्यवाद...फॉलो नक्की करा प्रशांतजी...
DeleteKup Chan artical
ReplyDeleteधन्यवाद...
ReplyDeleteThanks...
ReplyDeleteखुप छान.आज समाजात या विषयावर अजुन लेखन होणे गरजेचे आहे.
ReplyDeleteखुप छान सई . एका सवेदनशील विषयावर लेखन करून तो उत्कृषटरित्या मांडलास.
ReplyDeletePeriod yaa vishayawar swata ani gharatil etar sadhsyani support dila pahije he tumchya family kadun Navin shiknyasarke aahe.
ReplyDeleteInformative lekh