खरेदीच्या नावाने
दसरा झाला की चाहूल लागते ती
दिवाळीची...दिवाळी म्हणजे माझ्यासाठी नाविन्यचा शोध....बाजारात काय नवीन आले आहे,
याची कायम उत्सुकता असते....आणि दिवाळी म्हणजे या नवीन वस्तुंसाठी हक्काची
बाजारपेठ...त्यामुळे आता काय नवीन, हा माझा शोध चालू होतो...शिवाय घरामध्ये काहीतरी
नवीन वस्तू बनवायची...एखादे पेंटींग काढायचे...कागदाचे डेकोरेशन...मण्यांची
तोरणं...पणत्यांची विविधता...असं काहीतरी मी नेहमी शोधत असते...आणि हा सर्व शोध
थांबतो तो क्रॉफर्ड मार्केट परिसर आणि भुलेश्वरच्या गल्ल्यांमध्ये....
....
मुंबई छत्रपती
शिवाजी टर्मिनसपर्यंत ट्रेनने प्रवास करायचा आणि उतरलं की सरळ चालत जाचयं....मग
कधीच संपू नये असा खरेदीचा प्रवास चालू होतो...अरे हे काय...हे बघ किती छान
आहे...व्वा...व्वा...किती स्वस्त...मस्तच...अशा उत्सुकता भरल्या शब्दांनी ही खरेदी
यात्रा सुरु होते...अगदी सकाळी अकरा वाजता गेलं आणि सायंकाळी सात वाजले तरीही मन
भरत नाही... क्रॉफर्ड मार्केटचे सध्याचे नाव महात्मा जोतिबा फुले मंडई असे आहे. मुंबईतील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या
वास्तुंमध्ये या बाजाराचा समावेश होतो. १८६८
मध्ये ही वास्तू बांधण्यात आली. मुंबईचे पहिले आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांचे नाव या
बाजाराला देण्यात आले. हा बाजार आणि त्याच्या आसपासचा परिसर म्हणजे नाविन्याचा शोध
घेणा-यांसाठी अलीबाबाची गुहा आहे. कितीही
फिरलं तरी मन भरत नाही. ब-याचवेळा मी या बाजार आणि परिसराला भेट देते. फक्त खरेदी करण्यासाठी नव्हे तर ब-याचवेळा
इथल्या गल्ल्या परिचित करण्यासाठी सुद्धा भेट दिली आहे. गेली दहा ते बारा वर्ष माझी ही शोध यात्रा चालू
आहे. आणि खरं सांगते पहिल्यावेळी जसं
पाहिलं होतं तसाच हा परिसर मोहात पाडतो....


साधारण दीडशे वर्षांपासून ‘कपडय़ांचे होलसेल मार्केट’ अशी ओळख असलेल्या मंगलदास मार्केटची रचना ब्रिटिशकालीन आहे. कपडय़ांचे मार्केट म्हणून मंगलदास मार्केट देशभरात ओळखले जाते. हा भाग सतत माणसांनी गजबजलेला असतो. घाऊक व्यापारासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मार्केटमध्ये सुरुवातीच्या काळात कॉटनची विक्री मोठय़ा प्रमाणात होती. मुंबईत जेव्हा कपड्यांच्या मील होत्या तेव्हा या बाजारात खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात देशभरातून व्यापारी येत असत. आता या मील बंद झाल्यानंतरही या बाजारावर परिणाम झाला नाही. उलट कपड्यांचे विविध प्रकार येथे उपलब्ध होऊ लागलेत...आता तर तयार कपड्यांसाठी
याच परिसरात
थोडी पायपीट केली की लागतो तो भुलेश्वरचा परिसर....हा भुलेश्वर परिसर म्हणजे मनाला
भूल घालणारा परिसर...मी तर या भागात गेले की वेळेचं भान विसरते...भुलेश्वरच्या
गल्ल्या आहेतच तशा...इमिटेशन ज्वेलरी करण्यासाठी लागणारे सर्व सामान येथे
मिळते...किती प्रकारणे मणी, मोती, तारा आणि आणखी कितीतरी प्रकारचे सजावटीचे
सामान...हे घेऊ की ते घेऊ...असं म्हणण्याची वेळ येते...बरं दुकानं केवढीशी
आहेत..काही दुकानं तर माळ्यावर आहेत...हे लाकडी माळे चढेपर्यंत जाणवतं बापरे काय
हे...किती गरमी...पण मग या माळ्यावजा दुकानत गेलात की हरवल्यासारखं होतं...कितीतरी
प्रकारचे मण्याचे, टीकल्यांचे प्रकार येथे पहायला मिळतात...तशाच कितीतरी सजावटीसाठी
लागणा-या काचा, मोती...सजावटीचे हे सामान पाहून अगदी हरवल्यासारखे होते...

बरं फक्त खरेदीसाठी हा परिसर बेस्ट
आहे असं नाही...तर खरेदी करता करता अनेक असे पॉईंट आहेत जिथे तुम्ही पोटपुजेसाठी
थांबणारच.., भेलपुरी, पाणीपुरी, सरबत विकणारे यांची भेट हमखास होते. सुकी भेळ तर प्रत्येक
गल्लीमध्ये आहेच....परंतु या भागातील सर्वात चविष्ठ पदार्थ म्हणजे मसाला पापड......भाजलेल्या
पापडावर तिखट चटणी, कांदा, टोमटो, कोथंबीर
आणि वरुन भरपूर नायलॉन शेव...हे मिश्रण एवढं भन्नाट लागतं की कधीतरी खरेदीसाठी
नव्हे तर फक्त या मसाला पापडाची चव बघण्यासाठीतर भलेश्वरच्या गल्ल्यांमध्ये नक्की
भटकंती करावी...साधारण सायंकाळी पाच नंतर या मसाला पापडाच्या गाड्या दिसायला
सुरुवात होते....बरं हा पापड म्हणजे आपला घरगुती पापड असतो तसा छोटुसा नसतो...असे
घरगुती चांगले चार ते पाच पापड एकत्र केले की होईल एवढा मोठा पापड असतो...अशा
भाजलेल्या पापडाचे ढीग या गाड्यांवर लागलेले असतात...या पापडावर त-हेत-हेच्या
चटण्या, कितीही महाग असला तरी भरपूर आणि बारीक
केलेला कांदा, टोमॅटो, कैरीचे बारीक तुकडे(एकदा तर मी
माझ्या बहिणीने मनमुराद भटकंती केली. सायंकाळचे सात वाजून गेल्यावर घरुन फोन सुरु झाले...डोंबिवलीत तुफान पाऊस आहे...विजाही आहेत...आता आवरतं घ्या...आणि घरी या...तेव्हा किती वाजलेत याची जाणीव झाली...तरीही पुढचा तास आणखी काही खरेदीत गेलाच...शेवटी पुन्हा येऊया अशी मनाची समजूत काढून सीएसटीची वाट पकडली...शनिवार मुद्दाम निवडला होता...कारण ट्रेनला गर्दी कमी...आम्हा दोघींच्या हात बॅंगांनी भरले होते...ट्रेनमधली थोडीफार गर्दी या खरेदीच्या उत्साहापुढे फिकी वाटली...डोंबिवलीत उतरल्यावर पावसामुळे आलेला सुखद गारवा...मग काय सगळा थकवा गेला आणि पुन्हा लवकरच भुलेश्वरला जायचा बेतही झाला....
सई बने
डोंबिवली
-------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Sundar lekh
ReplyDeleteSundar lekh
ReplyDelete